अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व घाटनांदूर-अंबाजोगाई रेल्वे मार्ग करण्याची मागणी

केज :- दत्तात्रय मुजमुले
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न अनेक दिवसापासून रखडलेला आहे.मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही अथवा कोणी गांभीर्याने घेतही नाही. त्यामुळे वर्षांनुवर्षे याची मागणीच होत आलेली आहे.बीड जिल्हयाचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा जाहिर करावा त्याचबरोबर घाटनांदूर – अंबाजोगाई रेल्वे मार्ग करावा ही मागणी गेली अनेक वर्षापासून प्रलंबित आहे . महाराष्ट्र शासनाचे धोरण छोटे- छोटे जिल्हे निर्माण करणे बाबतीत झाले आहे . ही मागणी गेली 30 ते 35 वर्षापासून असून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी लागणारे जिल्हा स्तरावरील सर्व कार्यालय निर्माण झालेले आहेत.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसल्याने अंबाजोगाई जिल्हा करणे सर्व दृष्टीने सोयीस्कर आहे तेव्हा सदर मागणीची तिव्रता लक्षात घेता तात्काळ जो अंबाजोगाई जिल्हा जाहिर करावा अशी मागणी अंबाजोगाई जिल्हा युवा कृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अंबाजोगाई हे शिक्षणाचे माहेरघर असून येथे साडेतीन पिठापैकी एक पीठ असेलेले श्री.योगेश्वरी देवीचे तीर्थक्षेत्र आहे.देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात जवळच 12 ज्योतलिंगा पैकी एक परळी वैद्यनाथांचे मंदिर आहे.अंबाजोगाई हे आद्यकवी मुकुंदराज आणि श्रीसंत पासोडीकर दासोपंत यांचे समाधीस्थळ आहे.दिलेल्या निवेदनात मागणी केलेला रेल्वेमार्ग हा यापूर्वीच सर्वेक्षण करून मंजूर झालेला आहे केवळ निधीच्या तरतूदी अभावी हा खोळंबलेला आहे.म्हणून या मार्गास पुनःश्च मंजुरी व योग्य निधीची तरतूद करावी जेणेकरून मराठवाड्याच्या तसेच प्रामुख्याने अंबाजोगाईच्या विकासास व पर्यटनक्षेत्र विकासास चालना मिळणार आहे.वरील मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास अंबाजोगाई जिल्हा युवा कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर अभिजीत व्यंकटराव लोमटे,राजेश वाहुळे,महेंद्र निकाळजे,प्रशांत आदनाक,लहुजी शिंदे,राहुल लोमटे,उज्जैन बनसोडे,अमोल हतागळे,सुनील जगताप,अमित जाजू,भाई सौरव संगेवर, स.का.पाटेकर,भास्कर निर्मळ,अभिजीत लोमटे,शेख रमिज,यांच्यासह अंबाजोगाई जिल्हा युवा कृती समितीचे सदस्य,पदाधिकारी व अंबाजोगाई येथील नागरिक उपस्थित होते.