Uncategorized

बोरीसावरगावच्या विराट महासभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

केज :- दत्तात्रय मुजमुले

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले आहे.मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण आता अंतिम टप्प्यात असून त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे समाज जागृतीसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहे.येत्या १२ डिसेंबर रोजी केज तालुक्यातील बोरी सावरगाव येथे विराट महासभेला होणार आहे त्या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन छावा संघटनेचे जिल्हाप्रुमुख शिवाजी दादा ठोंबरे यांनी केले आहे.

गेली अनेक वर्षांपासून मराठा समाजाला सरकारने आरक्षण मिळु दिले नव्हते.गेली अनेक वर्षांपासून मराठा समाजावर घोर अन्याय झाला आहे.मराठा जातीचे हक्काचे आरक्षण ओबीसी प्रवर्गात आहे.हजारो वर्षांपासून मराठा जात ही शेती करत आलेली आहे.मराठा जातीच्या निजामकालीन व ब्रिटिश कालीन नोंदी कुनबी जात म्हणून सापडल्या आहेत.आता सरकारने चोवीस डिसेंबरच्या आत सरसगट मराठा समाजाला कुनबी प्रमाण पत्र देऊन टाकावे.सरकारने आता जास्त वेळ घेऊ नये.अन्यथा एकदा जर मराठा रणसंग्रामात उतरला तर त्याची खुप मोठी किंमत सरकारला मोजावी लागेल. मराठा तरूण हाताला काम मिळत नाही म्हणून गरीबीत जीवन जगत आहे.मराठा हा कुनबी आहे.त्यांना 50%च्या आतुन ओबीसी आरक्षण लवकरात लवकर मिळालेच पाहिजे.आज मराठा समाज एकराहुन गुंठे वारी शेतीवर आलेला आहे.मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती खुपच नाजूक झाली आहे.मायबाप सरकारने आता जास्त अंत बघु नये.

येत्या बारा डिसेंबरला सकाळी ठीक 10 वाजता संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची जाहीर सभा बोरीसावरगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.तरी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवाजी दादा ठोंबरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!