जागतिक जल दिन विशेष लेख -प्रा.डॉ.साळवे चंद्रकांत जनार्दन

*जागतिक जल दिन विशेष लेख*
आज 22मार्च संपूर्ण जगभरात जागतिक जल दिन ,World Water Day 2022 साजरा केला जात आहे .1992 मध्ये रिओ दि जानेरो येथे आयोजित संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण आणि विकास परिषद (UNCED)ने जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरुवात केली ,आणि पहिला जागतिक जल दिन 22 मार्च 1993 रोजी साजरा करण्यात आला .प्रतिवर्षी संयुक्त राष्टाचे सदस्य असलेल्या देशांकडून हा दिवस साजरा केला जातो.त्यासाठी प्रतिवर्षी एक नवी संकल्पना मांडली जाते.त्या संकल्पनेला अनुसरून वर्षभर उपक्रम राबवले जातात.उदा.पाणी आणि ऊर्जा,पाणी आणि शाश्वत विकास इ.पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, आयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते इतके त्याचे महत्त्व आहे ! संपूर्ण पृथ्वी वर 71% पाणी उपलब्ध आहे .आणि जगात केवळ 2.5%च पाणी पिण्या योग्य आहे.जेव्हा बाळाचा जन्म होतो ,तेंव्हा त्याच्या शरीरात 90% पाणी असते .जेंव्हा मूल मोठे होते ,तेंव्हा त्यात 70%पाणी असते ,जेव्हा तेच बाळ, मोठे होऊन म्हातारे होते ,तेंव्हा त्याच्या शरीरात सुमारे 75% पाणी राहते.मानवी शरीरातील महत्वाच्या अवयव यामध्ये , मेंदूत 75% पाणी , रक्तात 83% पाणी आणि हाडांमध्ये 25% पाणी राहते ,यावरून आपल्या लक्षात येईल की पाणी असेल तरच आपले जीवन आहे.पावसाच्या पाण्याची साठवणूक कशी करता येईल? भूजलाची पातळी कशी थांबवता येईल ? तलावांमधील आक्रमण थांबवून त्यांचं संवर्धन कसं करता येईल ? पाण्याचा पुनर्वापर कसा होईल ? पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल ? पाण्याचा सरकारीकरण कसं थांबवता येईल ? याचे जनप्रबोधन करून जलसाक्षरतेचे महत्त्व पटवून ठेवूया !”काय उपयोग तुमच्या पैशांचा, आणि सोन्याच्या नाण्याचा, जेव्हा नसेल तुमच्याकडे,एकही थेंब पाण्याचा”…. प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लागतात पाण्याचा वापर करणे आपण थांबवू शकत नाही पण पाण्याच्या सुयोग्य वापर यामुळे पाणी वाचवू शकतो उद्याची तहान भागवण्यासाठी.
शेवटी एवढेच म्हणेन…
“आपण पाणी वाचवु शकतो”पण बनवू शकत नाही.आजोबांनी नदीत पाणी पहिले वडिलांनी विहिरीत पहिले…मी नळात पाहिले… माझ्या मुलांनी बाटलीत पाहिले… पुढची पिढी कुठं बघेल….. हा विचार करा… त्यामुळे “पाणी वाचवा देश वाचवा.
“*प्रा.डॉ.साळवे चंद्रकांत जनार्दन*
*वन्यजीव अभ्यासक-बीड*