राजीव गांधी माध्यमिक विद्यालय ,नेहरूनगर येथे इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचे 25 वर्षानंतर स्नेह संमेलन संपन्न.

(पिंपरी चिंचवड)प्रतिनिधी:- राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर या ठिकाणी 8 जून 2025 रोजी 25 वर्षानंतर 10 वी च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या आनंदाने उत्साहात संपन्न झाले.यावेळी 25 वर्षांनी संपूर्ण विद्यार्थी मित्र मैत्रिणी पुन्हा एकत्र आल्याचे पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला या विद्यार्थ्यांनी राजीव गांधी माध्यमिक विद्यालयांमध्ये आपल्याच 10 वी च्या वर्गातच आपला हा 25 वा स्नेहसंमेलन मेळावा आनंदात साजरा केला.यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील आत्ताच्या करिअर वरती प्रकाश टाकला प्रत्येक जण सामाजिक आर्थिक राजकीय व्यावसायिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलेल आहे यामुळे शाळेचे नाव देखील उंचावलं आहे अशी प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय नलिनी जाधव मॅडम यांनी व्यक्त केली. यावेळी नेहमीप्रमाणे एक दिवस शाळेसाठी या अनुषंगाने इयत्ता दहावी 1999/2000 सालच्या विद्यार्थ्यांनी आपली शाळा भरवली नेहमीप्रमाणे 12 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मुले गणवेशा मध्ये मैदानात उभी राहिली त्यांनी संपूर्ण परिपाठ मैदानावर घेतला राष्ट्रगीत प्रतिज्ञा आणि खरा तो एकची धर्म ही प्रार्थना मुलांनी घेतली यावेळी प्रत्येक जण या वातावरणामध्ये मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले.वर्गामध्ये प्रवेश केला आणि जुने रजिस्टर घेऊन 1999/2000चे वर्ग शिक्षक असलेले माननीय प्राध्यापक अंकुशराव सर यांनी सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेतली यावेळी विद्यार्थ्यांना आपले हजेरी रजिस्टर पाहून खूप आनंद झाला. शाळेचे सर्वांचे लाडके शिक्षक आदरणीय प्रा.संपत पानसरे सर यांनी नेहमीच मुलांना प्रेरणादायी प्रोत्साहन देऊन आयुष्य घडवण्यासाठी खूप मोलाचे सहकार्य केले याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे आभारही व्यक्त केले संघर्ष शिवाय जीवनामध्ये काहीच मिळत नाही दुःखाची दरी ओलांडल्या शिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही संघर्ष खूप मोठा असतो आठवणी कटू असतात परंतु त्यातून विजय मिळाल्यानंतर कष्टाचे चीज झाले असे वाटते कुणी वाईट काळात खचून जाऊ नये वाईट काळ हा फार काळा पुरता नसतो संघर्षाने चांगला काळ येतो असे मनोगत अंकुशराव सर यांनी यावेळी व्यक्त केले यानंतर शाळेचे क्रीडा शिक्षक बोराडे सर यांनी देखील मुलांना जीवनात आई-वडिलांचे मूल्य किती महत्त्वाचे आहे या संदर्भात मार्गदर्शन केले आणि प्रत्येक वरिष्ठांचा आदर हा जीवनामध्ये यशस्वी मानवी मूल्याचा मार्गदर्शवतो असे मनोगत व्यक्त केले तसेच सासवडे सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय नलिनी जाधव यांनी या स्नेहसंमेलनानिमित्त उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना 25 वर्षाच्या शाळेच्या सहभागाबद्दल त्यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला यावेळी विद्यार्थी संतोष जोगदंड दीक्षा सातपुते दीपक खरात सोमनाथ भोंगाडे राणी गुंडे सचिन गायकवाड नितीन खांडवी सुप्रिया गंगावणे रवी वाघमारे मल्लिकार्जुन लचान विश्वरूप अंधारे विकास भुबें धनराज कसबे भरत महानवर अतुल शिंगाडे शिवाजी सावंत पुष्पा खरात विद्या ठोके जयश्री काकडे करुणा गोरे गणेश सूर्यवंशी सुशांत गायकवाड बबलू पठाण आदी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होता आपल्या 25 वर्षाच्या या शाळेच्या आठवणीने प्रत्येक विद्यार्थी यावेळी भावनिक झाल्याचे दिसले अनेकांनी आपल्या त्यावेळच्या शिक्षकांच्या आठवणी मनोगतातून विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या सर्व कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य करणारे शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय प्रा.नलिनी जाधव यांचे सर्व विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले.