Uncategorized

गेल्या दोन महिन्यांपासून डीपी चा लपंडाव सुरू

केज :- प्रतिनिधी

तालुक्यातील मौजे नायगांव येथील ग्रामस्थ महावितरणच्या गलथान कारभाराला,विजेच्या आणि डीपीच्या लपंडवास वैतागले असून दोन दिवसात वीज न आल्यास (डीपी) न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

दीपावलीच्या आगोदर गावातील डीपी जळाले होते तेव्हापासून नायगाव येथील डीपीचा लपंडाव सुरू झाला आहे,तो आजपर्यंतची चालूच आहे.गावात एकूण दोन डीपी असून त्याचा लाभ मिळत नाही.एका डीपीचा लपंडाव सुरू आहे.तर दुसऱ्या डीपी वर लोड दिल्याने दुसराही डीपी जळेल यामुळे संपूर्ण गाव अंधारात आहे.साधारणतः दोन महिन्यात चार ते पाच डीपी जळाले आहेत.येणारे डीपी चांगल्या प्रकारे भरले असतात का ?हे डीपी कितपत खात्रीचे आणि चांगल्या प्रतीचे असतात यावरही प्रश्न चिन्ह आहे.

गावात वीज नसल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.इतरत्र पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.विजेविणा शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.या बाबींकडे महावितरणचे दुर्लक्ष आहे.फक्त वसुलीसाठी महावितरणचे अधिकारी काळजी करतात मात्र विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना वेळ नसतो.विजेबाबतीत जे अडथळे असतील ते सोडविण्याचे काम हे महावितरण कर्मचारी यांचे आहे.

या सर्व बाबींना कंटाळून या डीपी येईल उद्या येईल हे ऐकून थकल्याने नायगाव येथील ग्रामस्थ उपोषणाला बसण्याच्या तयारीत असल्याचे नागरिकांनी बोलताना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!