विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

अंबाजोगाई :- दत्तात्रय मुजमुले
चालु खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकावर गोगलगाय प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.या होत असलेल्या
तसेच शिधापत्रिका धारक कुटुंबाचे नावे शेतकरी नसताना वास्तविक ते गोरगरीब मजुर असताना त्यांची नावे शेतकरी म्हणून समाविष्ट झालेली आहेत.अशा कुटुंब धारकांची नावे अन्न सुरक्षा योजने अंतर्गत समाविष्ठ करुन त्यांना अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभ देण्यात यावा.व त्याचप्रमाणे संजयगांधी श्रावणबाळ वृध्दापकाळ व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांच्या निवडी संदर्भात तात्काळ बैठक घेण्यात येऊन लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळवून द्यावा.
अशा विविध मागण्यांसाठी केज विधानसभेचे मा.आ.पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,अंबाजोगाई यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने निवेदन देण्यात आले.