Uncategorized

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्शवभूमीवर बहुजन रयत परिषदेची मागणी

केज / दत्तात्रय मुजमुले

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे बहुजन रयत परिषदे च्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साठी रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची यंदा १०३ वी जयंती साजरी होत आहे.

अण्णाभाऊ साठे यांना दैवत मानणारा मातंग समाज महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहे.या समाजाच्यावतीने १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.या निमित्ताने सर्व समाज बांधव एकत्र येतात. विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.त्यामुळे हा फक्त उत्सव नसून लोकोत्सव बनला आहे.

असा हा लोकोत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण ऑगस्ट महिना रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी या मागणीचे निवेदन बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी राज्याचे उपमख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानभवन येथे दिले.यावेळी बहुजन रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!