क्रांतिसिंह नाना पाटील,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व शेकापच्या ७६ व्या वर्धापन दिन साजरा

केज :- दत्तात्रय मुजमुले
क्रांतिसिंह नाना पाटील अण्णाभाऊ साठे व शेतकरी कामगार पक्षाचा ७६ वा वर्धापन दिन केज येथील शिक्षक पतसंस्थेमध्ये मोठ्या संख्येच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला , शेतकरी कामगार पक्षाचा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व कॉ. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधुन कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला, वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम केज येथे आयोजित करण्यात आला होता .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प.स सभापती मा.राजेसाहेब ( पापा ) देशमुख हे होते तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणुन कॉ. काशीनाथ कापसे सर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. नारायण गोले पाटील , प्रा. हनुमंत भोसले , शिवाजी ठोंबरे , डॉ उत्तम खोडसे , गोविंद आगळे हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे व कॉ. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला . यानंतर यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेकापचे नेते भाई मोहन गुंड यांनी केले तर हनुमंत घाडगे हानुमंत भोसले, दत्ताभाऊ बारगजे , सौ. मनिषा पवार, सुधाकर देशमुख, भाई गोले पाटील, गोविंद आगळे.यानी मनोगत व्यक्त केले त्यानंतर प्रसिद्ध कवि प्रा.इंद्रजित भालेराव म्हणाले आण्णाभाऊ साठे. नाना पाटील यांची जयंती ही विचारांची जयंती आपन साजरी करत आहात याचा आज मनस्वी आनंद वाटला, कॉ अण्णाभाऊ साठे साहित्य फकीरा, स्मशानातील सोनं हे पुस्तक वाचलं तरी अण्णाभाऊ किती मोठे होते हे कळतं सर्वात पहिला पुतळा रशियात उभा केला, येढ्या मोठ्या उचिचे नेते होऊन गेले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या राजकीय सामाजिक मुसुगिरी बद्दल त्यांनी पूर्ण जीवनपट अवघ्या दहा मिनिटात डोळ्या समोर उभा केला, पन या क्रांतीवीराने लाल झेंडा सोडला नाही. एकेकाळी क्रांतीसिंह नाना पाटील देशातल्या युवकांचे आयकॉन होते ही त्यांनी नमूद केले.व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर अध्यक्षीय समारोप राजेसाहेब ( पापा ) देशमुख यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. हनुमंत सौदागर यांनी केले तर आभार ॲड निखिल बचुटे यांनी मानले. सदरील कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते तथा लहान वृद्धांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाई अशोक रोडे, मंगेश देशमुख शरद कांबळे , हनुमंत चाळक, महेश गायकवाड, अशोक डोंगरे, डिगांबर मगर, बाबाराजे गायकवाड, कृष्णा रोडे,अजित पौळ, अनंत गलांडे, सनी शेख, आदिंनी परिश्रम घेतले.
चौकट :- कार्यक्रमात भाई उमाजी राजेंद्रराव देशमुख ( ज्येष्ठ नेते शेकाप धाराशिव) ,सुधाकर देशमुख (वृक्षमित्र आंबेजोगाई ),दत्ताभाऊ बारगजे ( संस्थापक आनंदग्राम बीड ), मुख्तार शेख चाचू (समाजसेवका आंबेजोगाई ), सौ. मनिषा पवार (आपलं घर वृद्धाश्रम नेकनुर ),हनुमंत घाडगे (लेखक केज ),कॉम्रेड काशिराम शिरसट धारुर) यांना मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसिंह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.