Uncategorized

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ छावा संघटनेची मागणी

केज :- दत्तात्रय मुजमुले

बीड जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने मागील २१ दिवसांपेक्षा जास्त काळापासून पावसाचा खंड आहे. अनेक महसूल मंडळात २१ दिवसांचा खंड कागदावर दाखवत नसला तरी प्रत्यक्षात परिस्थिती बिकट असून, पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांमधून मोठी ओरड होत असल्याने दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी सर्वे करण्याचे आदेश दिले.

मात्र मागील महिन्यापासून पावसाचा एक थेंब पडला नाही त्यामुळे कशाचे पंचनामे? आणि कशाचे सर्वेक्षण? बळीराजा संकटात सापडला आहे.त्याला सरसकट मदतीची अपेक्षा आहे.पावसाचा एक थेंब पडला नाही त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची गरज असल्याचे मत शिवाजी ठोंबरे यांनी व्यक्त केले तर केज, धारुर या दोन तालुक्यांना कोणी वालीच राहिला नाही? अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.व केज व धारूर तालुक्याचा प्रशासनाने विचार करून बीड जिल्ह्यात सरसगट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी छावा चे जिल्हा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांनी सदरील प्रसिद्धी पत्रकात केली आहे.

मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून कृषी अधिकाऱ्यांनी सर्वेचा अहवाल दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सोयाबीन ५२, मुग २२, उडीद १३ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५ % अग्रीम देण्यासाठी अधिसूचना काढली आहे. याबाबत सर्वच महसूल मंडळात अग्रीम मंजूर झाल्याच्या बातम्याही वर्तमानपत्रात झळकलेल्या आहेत. परंतु केज आणि धारुर तालुक्यातील एकही महसूल मंडळ मंजुरी मध्ये दिसत नाही.

त्यामुळे या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम विमा मिळणार की, नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.त्यामुळे कोणतेही पंचनामे न करता तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!