Uncategorized

होळ महसुल मंडळातील शेतकऱ्यांना २५% आग्रीम देण्याची मागणी

केज :- दत्तात्रय मुजमुले

खरीप हंगामात जुलै – ऑगस्ट महिन्यात मध्ये बीड जिल्ह्यातील म्हणजेच सर्व तालुक्यातील मंडळात दीर्घकाळ पावसाने हुलकावणी दिल्यामुळे मोठा खंड पडलेला असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व मंडळातील पिके धोक्यात आली आहेत. हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून आता ते सुकून गेली आहेत. 7 लाख पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावरील पीके पावसाने खंड दिल्याने अडचणीत आले आहे. कापूस, तूर, सोयाबीन, मूग ,उडीद सह इतर पिके पावसापाण्याअभावी सुकुन गेल्या आहेत. पावसाळ्याचे तीन महिने संपत येत असताना केवळ 40%पाऊस पडला आहे. या कमी पर्जन्यमानामुळे कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.काही ठिकाणी पिके हिरवी दिसताहेत मात्र त्याला लागणाऱ्या फुलं ही करपून गेली आहेत.

अशीच अवस्था केज तालुक्यातील होळ महसुल मंडळाची झाली आहे. गेल्या ६० दिवसांपासुन या मंडळात पाऊस पडलेला नाही.त्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून कापूस, तूर, सोयाबीन, मूग ,उडीद सह इतर पिके पावसापाण्याअभावी करपून जात आहेत. वाळून जात आहेत.तरी शासनाने तात्काळ उपायायोजना कराव्यात आणि सर्व शेतकऱ्यांना २५% आग्रीम तात्काळ मंजुर करावा व विमा कंपनीस २५% आग्रीम देणे बाबत आदेशीत करावे व जर आम्हा शेतकऱ्यांना २५% आग्रीम नाही दिला तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचं इशारा निवेनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर रामराव लोमटे,राजेश शिंदे,भास्कर शिंदे,बाबुराव यादव,बाळासाहेब लाड यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!