कुंबेफळ येथे विजेच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक

केज :- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील मौजे कुबेंफळ सबस्टेशन वर अतिरीक्त जोडलेली गावे काल महावितरणने त्यांच्या कक्षेनुसार कट केली होती. ती परत जोडण्यासाठी राजकीय दबाव येत असल्याने अभियंता यांच्याकडुनही कर्मचारी यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता.जर या सबस्टेशनला तोडलेला अतिरीक्त भार परत जोडला तर इथल्या शेतकऱ्यांना सातत्याने अडचणीचा सामना करावा लागतो अन् यामुळेच मागच्या काळात विजे अभावी भाजीपाला पिकांचे,सोयाबीनचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यामुळे मागच्या दोन महिन्यात कुबेंफळ व ढाकेफळ प्रत्येकी एक एक शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.किमान या घटनेनंतर तरी महावितरणने व प्रशासनाने सतर्क होणे गरजेचे होते पण तसे झाले तर नाहीच त्याउलट शेतकऱ्यांना जास्तीचे वेठीस धरण्याचे काम प्रशासन करत आहे.
सदरील अतिरीक्त भार जोडण्यात येऊ नये व कुबेंफळ सबस्टेशनवर 5MVA ची क्षमता तात्काळ वाढवावी तसेच सध्या पावसाअभावी दोन महिने झाले पीके पार करपुन गेलीत,हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोय.तसेच काल जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीसांनी लाठीचार्ज केला त्याचा शेतकऱ्यांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी कुबेंफळ,ढाकेफळ,जानेगाव,सारणी,बनकरंजा येथील सरपंच,उपसरपंच व शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने विजेच्या अड आंदोलनास उपस्थित होते.