*मांजरा धरणाचे कार्यालय धरण क्षेत्रात करून धरणाचे अधिकार बीड जिल्ह्यास देण्यात यावे या मागणीसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन*

*मांजरा धरणाचे कार्यालय धरण क्षेत्रात करून धरणाचे अधिकार बीड जिल्ह्यास देण्यात यावे या मागणीसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन*
*अजित पवारांनी ताफा थांबवून स्वीकारले संभाजी ब्रिगेड चे निवेदन*
“बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची “धरण उशाला अन कोरड घशाला”*
केज :- दत्तात्रय मुजमुले प्रतिनीधी
तालुक्यातील धनेगाव येथे असलेले मांजरा धरण हे लातूर,उस्मानाबाद,बीड जिल्ह्यातील केज,अंबाजोगाई शहरासह अनेक गावांना पाणी पुरवठा करणारे एकमेव धरण आहे या धरणाचे अधिकार बीड जिल्हा प्रशासनाकडे होते परंतु कालांतराने ते अधिकार स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ते अधिकार व कार्यालय लातूर येथे हलवण्यात आले त्यामुळे येथील धरणग्रस्त शेतकरी वर्गाला कार्यालय लातूर येथे असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असून कसल्याही प्रकारचा कागद काढायचा असेल तरी लातूरला,काही छोटे जरी काम असेल जा लातूरला यामुळे येथील शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तसेच या धरणाचा जवळपास 70%लाभ हा लातूर जिल्ह्याला होत आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची *धरण उशाला अन कोरड घशाला* अस झाले आहे. त्यामुळे आज अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी येडेश्वरी साखर कारखाना येथे डिसलरी उद्घाटन करण्यासाठी आले असता संभाजी ब्रिगेड च्या वतीने मांजरा धरणाचे कार्यालय धरण क्षेत्रात करावे तसेच धरणाचे अधिकार बीड जिल्ह्यास देण्यात यावे या मागणीचे निवेदन ताफा अडवून देण्यात आले.
यावेळी निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे विभागीय उपाध्यक्ष विलास गुंठाळ, मा.तालुका अध्यक्ष राहुल खोडसे,संदीप शितोळे,राजेश तपसे,मयूर टोंपे,अभिषेक भिसे यांच्या स्वाक्षरी आहेत..