प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेवर हजर राहणे आवश्यक

अंबाजोगाई :- तालुक्यातील घाटनांदुर सर्वात मोठी बाजारपेठ आहे.घाटनांदुरला लगत असलेल्या वाडीखेडीतील लोक मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या परिसरात मोठे आहे. साळुंकवाडी ,दत्तपूर ,तळणी, घोलपवाडी ,चोथेवाडी, अंबलटेक, तेलगणा ,चौपनवाडी, नागदरा ,दौडवाडी, आनंदवाडी, लाडझरी ,पट्टीवडगाव, मैंदवाडी तांडा, या परिसरातील लोक प्राथमिक आरोग्य केंद्र कडे येतात.मात्र घाटनांदुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरच वेळेवर हजर असल्याच्या रुग्णांच्या तक्रारीत वाढ होत आहे.लोकांना चांगल्यात चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन लाखो करोडो पैसे खर्च करत आहे,शासन डॉक्टर व कर्मचाऱ्यावर पैसे खर्चत आहे. ओपीडीच्या बाहेर रोज अनेक रुग्ण उभे असतात.डॉक्टर वेळेवर येत नसल्यामुळे,रुग्ण व नातेवाईक ताटकळत उभे असतात. शासनाने दिलेल्या वेळेला न जुमानता डॉक्टरचा मनमानी कारभार दिसून येत आहे, आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा पेशंट गर्दी करतो तेव्हा त्याला सरकारी दवाखान्याची समिती सन – साधनांचा हवाला देत असते.नागरिकांमध्ये अशीही चर्चा होती की,येथील डॉक्टर चांगल्यात चांगला विलाज करीत होते म्हणून आता घाटनांदुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पेशंटची गर्दी वाढली खरी मात्र दवाखाना सकाळी 9 वाजता उघडतो आणि डॉक्टर हे 10 वाजता येतात म्हणून दवाखान्याच्या बाहेर रांगाच रांगा लागल्या होत्या हा रोजचाच नीतीक्रम चालत आलेला आहे.घाटनांदुर येथील एका पेशंटने घाटनांदुरचे सरपंच महेश वैजनाथ( आप्पा) गारटे यांना फोन करून माहिती दिल्यानंतर ते तात्काळ तिथं आले, व तात्काळ त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना फोन लावून तेथील घटना सांगितली. डॉक्टर आल्यानंतर पेशंटची तपासणी सुरू झाली. व तेथील पेशंटने सरपंचाचे आभार व्यक्त केले.