शेतकऱ्यांनी खत बि-बियाणे खरेदी करताना कृषी दुकानादाकडुन पक्की पावती घ्यावी.

केज :- ( प्रतिनिधी )
खरीप पेरणीची लगबग सुरु झाली आहे, शेतकरी बी-बियाणे खरेदीसाठी लगबग करत आहेत, यापूर्वी अनेक बियाणे बोगस निघाले आहेत. बियाणे पेरले तर ते उगवलच नाही, सावधगिरी म्हणून, खत बी-बियाणे घेताना शेतकऱ्यांनी पक्क्या पावत्या कृषी दुकानदाराकडून घ्याव्यात असे आवाहन भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी केले आहे.
मागील वर्षी खताचा तुटवडा दाखवून बेसुमार भवाने खत विक्री केल्याच्या घटना समोर आल्या होत्या, यावर्षी ही अनेक शेतकऱ्यांनी अनेक कृषी दुकानदाराच्या तक्रारी माझ्याकडे फोन द्वारे केल्या आहेत, मी दोन दिवसात जिल्हा कृर्षी कृषी अधिकाऱ्याची भेट घेणार आहे, मागील वर्षी सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली होती. पावत्या नसल्यामुळे कृषी दुकानदार नंतर शेतकऱ्याला बोलू देत नाहीत, म्हणून शेतकऱ्यांनी कृषी दुकानदाराकडून पक्की पावती घेतल्याशिवाय खत बी बियाणे खरेदीच करू नये, खत बियाण्याच्या एमआरपी पेक्षा अधिक पैसे कोणाला ही देऊ नयेत कोणी खत बी-बियाण्याचा तुटवडा करीत असेल, अधिक पैसे मागत असेल असेल, इतर काय अडचण असल्यास 94 23 97 94 92 या माझ्या नंबर वर संपर्क करावा असे आव्हान शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.