कोथिंबीरवाडी येथील उजगरे कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी रिपाइचे निवेदन

कोथिंबीरवाडी येथील उजगरे कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी रिपाइचे निवेदन
केज (दि. ३० मे):- धारुर तालुक्यातील कोथंबीरवाडी येथे जमिनीच्या वादातून उजगरे कुटुंबावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही करावी. यासाठी केज तालुका रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या बाबतची माहिती अशी की, धारूर तालुक्यातील तेलगाव पासून जवळ असलेल्या कोथिंबीरवाडी येथील बालासाहेब रोहिदास उजगरे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या मालकीच्या शेतात तेथील गुंड जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांनी उजगरे कुटुंबाच्या शेतात दगड-गोटे टाकुन त्यांची जमीन मुद्दामहून नापिक करण्याच्या हेतुने व ते अनुसुचित जातीचे असल्यामुळे हेतुपुरस्करपणे दि. २६मे २०२२ रोजी लाठ्या-काठ्याने व लोखंडी सळयाने बेदम मारहाण केली. हल्लरखोरांनी त्या हल्ल्याचे व्हिडीओ चित्रिकरण करुन सोशल मीडियावर व्हायरल केले. उजगरे कुटुंबातील महिला, पुरुष व मुलांना जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ केज तालुका रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) केजच्या वतीने तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा सचिव उत्तम आप्पा मस्के यांच्या उपस्थितीत सचिव गौतम बचुटे, शहराध्यक्ष भास्कर मस्के, उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, जेष्ठ कार्यकर्ते दिलीप बनसोडे, राहुल बचुटे व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार दुलाजी मेंडके यांची भेट घेऊन कोथंबीरवाडी येथील उजगरे यांच्या हल्ल्या प्रकरणी निवेदन दिले आहे. निवेदनात हल्लेखोरावर खुनाचा प्रयत्न करणे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद करुन हल्ला करणाऱ्या आरोपींना ताबडतोब अटक करण्यात यावी. उजगरे कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. उजगरे कुटुंबियांना ५ लाख रु. शासकीय मदत देवून न्याय देण्यात यावा. या मागण्या केल्या आहेत.
निवेदनावर दिपक कांबळे, उत्तम आप्पा मस्के यांच्यासह भास्कर मस्के, गौतम बचुटे, बाळासाहेब ओव्हाळ, दिलीप बनसोडे, राहुल बचुटे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.