पाचीपिंपळा तांडा येथील वीज पुरवठा तात्काळ सुरू करा अन्यथा उपोषण करू:- प्रा.ईश्वर मुंडे

पाचीपिंपळा तांडा येथील वीज पुरवठा तात्काळ सुरू करा अन्यथा उपोषण करू:- प्रा.ईश्वर मुंडे
कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन
किल्ले धारूर /प्रतिनिधी घर घर बीजली हा मा.पंतप्रधान यांचा दावा किती पोकळ आहे हे धारूर तालुक्यांतील पाचीपिंपळा तांडा येथे गेल्यावर समजेल. ग्राम पंचायत रूई (धारूर) अंतर्गत पाचीपिपळा तांडा हा एक हजार लोकसंख्या असलेला तांडा आहे.बहुतांश लोक ऊसतोड मजूर आहेत.ते ऊस तोडणीला बाहेर गावी गेल्यावर गावात फक्त वयोवृध्द व्यक्ती असतात.त्यांना त्यांचा किराण व दैनंदिन गरजा भागवणे अडचणीचे असते अशा वेळी महा वितरण च्या कर्मचाऱ्यांनी वीज बील वसूली नाही या कारणास्तव सर्व मीटर काढून नेहले आहेत.या मुळे हा तांडा सात महिन्यापासून अंधारात आहे.तेथील घरा घरात मोठे उंदीर,घुशी व सापांचा वावर आहे.या मुळे तेथील रहिवाशी भयभीत झालेले आहेत.
ऊस तोडणीला गेलेले ग्रामस्थ आता गावी परत आलेले आहेत.लग्न सराई चालू आहे.पाहुण्यांची ये जा चालू झालेली आहे परंतू गावात सात महिन्यापासून वीज पुरवठाच नाही.ही बाब गंभीर आहे. ही बाब गावकऱ्यांनी प्रा.ईश्वर मुंडे, प्रदेश सरचिटणीस,राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी,ओबीसी सेल यांच्या कानावर घातली. प्रा.ईश्वर मुंडे यांनी पाचीपिंपळा तांडा येथे भेट देवून ग्रामस्थांची बैठक घेतली.त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या.सर्व समस्या आ.प्रकाशदादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवू असे अश्वासन प्रा.ईश्वर मुंडे यांनी ग्रामस्थांना दिले. तेथील प्रमुख समस्या म्हणजे गावातील वीज पुरवठा सात महिन्यापासून खंडीत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी प्रा.ईश्वर मुंडे यांनी कार्यकारी अभियंता,महा वितरण,अंबाजोगाई यांना तात्काळ वीज पुरवठा सुरू करणे बाबत निवेदन दिले.दि.२०/५/२२ शुक्रवार पर्यंत वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला नाही तर गावकऱ्यांना सोबत घेवून राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीच्या वतीने दि.२१/५/२२ रोजी अंबाजोगाई कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आसल्याचा ईशारा प्रा.ईश्वर मुंडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.सदरील निवेदन गुरूवार दि.१९/५/२२ रोजी ना.नितीन राऊत, ऊर्जा मंत्री,महाराष्ट्र राज्य यांना मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून देणार आसल्याचे प्रा.ईश्वर मुंडे यांनी सांगितले.
या वेळी रूई येथील माजी सरपंच अनील सोळंके,राष्ट्रवादीचे आशोक वाघमारे उपस्थीत होते.