Uncategorized
कापसाच्या झाल्या वाती अन् सोयाबीनची झाली माती कशी करावी शेतकऱ्याने शेती:- दादासाहेब नन्नवरे

बीड प्रतिनिधी :-
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने आसमानी संकट उभे केले आहे.हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे,तरी सरकार आपल्याच धूंदीत आहे,यांच्या जिरवाजिरवीत जगाचा पोशिंदा मात्र दिवाळी सणापासुन वंचित राहणार आहे,सरकारी यंत्रणा कमकुवत झाली आहे. ज्या शेतात गुडगाभर पाणी आहे तेथे फक्त 10मिमी पाऊस यंत्रणा दाखवत आहे.
आता सरसकट पंचनामे करुन हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर या सरकारने करावी अन्यथा या जगाच्या पोशिंद्यासाठी डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दादासाहेब लक्ष्मण नन्नवरे (प्रदेश संयोजक डे.यु.ब्रि.म) दिला आहे.