चिंचोली (माळी) येथे आजी-माजी सैनिकांचा सन्मान.

केज :- दत्तात्रय मुजमुले
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वातंत्र्य दिनानिमित्त चिंचोली माळीच्या कर्तव्य दक्ष सरपंच सौ रोहिणी सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने व राम प्रभु राऊत मेजर यांच्या सहकार्याने चिंचोली माळी व परिसरातील आजी माजी सैनिकांचा सन्मान सोहळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मंगळवारी सकाळी संपन्न झाला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील चिंचोली माळी गावची सैनिकांचे गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. या गावाच देशाच्या संरक्षणासाठी मोलाचं योगदान आहे, आणि या आजी माजी सैनिकांचा सन्मान झाला पाहिजे व त्यांना पुढील जीवनात स्पुर्ती मिळाली पाहिजे या उदात्त हेतूने चिंचोली माळीच्या कर्तव्य दक्ष सरपंच सौ रोहिणी सुनील देशमुख यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वातंत्र्य दिनानिमित्त परिसरातील आजी माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.यावेळी. मोहन मारुती नखाते, मुरलीधर रामराव नखाते, दिलीप शामराव बर्डे, शशिकांत बापूराव शिंदे, प्रल्हाद लक्ष्मण शिंदे, नारायण भानुदास शिंदे, मोहन किसन बोर्डे, महादेव रंगनाथ वाळके, शेख मेहबूब दगडू, अशोक तुळशीराम सारुक, मोहन भानुदास गायकवाड, धनराज भगवान नखाते, मिठूराव भाऊराव नखाते, बब्रुवान किसन काळे, प्रभाकर घोडके, अशोक भानुदास वडवले, जयसिंग बापूराव नखाते, कृष्णा देशमुख, आनंत उद्धव गायकवाड, मदन बालासाहेब गायकवाड, महादेव प्रभू नखाते, राम गणपती गायकवाड, दिनेश संप्पती घोडके या माजी सैनिकांचा तर दोन तरुण मुलांना देश संरक्षणासाठी पाठविल्याबध्दल सुनील बब्रुवान नखाते यांचा तर सध्या देश सेवेत कार्यरत असलेले स्वप्नील संजय राऊत, सुरज मधुकर गलांडे, महादेव दिलीप बजगुडे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच याच वेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या शिलाफलकाचे अनावरण, व मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत 75 देशी वृक्षांची लागवड (अमृत वाटीका) करण्यात आली व स्वातंत्र्य वीरांना वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आठवले हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी सविता शेप मॅडम, बालविकास अधिकारी शोभा लटपटे मॅडम, ह.भ.प. केशव महाराज शास्त्री, सुनील गलांडे, राम प्रभु राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ महादेव सांगळे, ह.भ.प.सुनील महाराज गालफाडे, ह.भ.प.विष्णू महाराज राऊत, ग्रामविकास अधिकारी खाडप साहेब, सोनाली घोडके, रमेश देशमुख, सुरज गायकवाड सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मा. सरपंच सुनील बापू देशमुख व सदस्य बाळु राऊत यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गलांडे यांनी केले