पावसाने दडी मारल्याने शेती पिकांचे नुकसान

केज :- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यात जवळपास मागील एका महिन्यापासून पाऊस न पडल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान होत असून उभे पीक करपत आहेत.काही ठिकाणी पीक हिरवी दिसत आहेत मात्र पाण्याअभावी फुलं गळून चालली आहेत.त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करा,शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
पावसाच्या खंडामुळे संपूर्ण तालुक्यातील पिके वाळत आहेत.शेतकरी वर्ग चिंतातुर झालेला असताना कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही.सत्ताधारी आपापली पोळी भाजण्यात व्यस्त आहेत. पीक विमा कंपनीने जिल्हा भरातील शेतकऱ्यांना पिकविम्याची सरसकट 25℅ अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवीण खोडसे यांनी दिला आहे.