Uncategorized
सात दिवसांपासून अर्धे गाव अंधारात !

केज :- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील मौजे इस्थळ येथील डीपी जळाल्याने गेल्या आठवडाभरापासून अर्धे गाव अंधारात आहे.त्यामुळे पुनश्च एकदा महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.त्यामुळे गावातील नागरिक महिला आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लाईटची अत्यंत गरज असते.आणि अशातच सात आठ दिवस लाईट नसल्याने गावातील नागरिक महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.त्यावर महावितरण प्रशासन काय भूमिका घेणार आणि कधी डीपी ऊपलब्ध करून देणार हे पाहणे आवश्यक आहे.