मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्रं करु : राजेसाहेब देशमुख

अंबाजोगाई :- महेंद्र गोदाम प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली असून मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आता उमेदवारांकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. बीडच्या परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारानं मतदारांना दिलेल्या आश्वासनाची सध्या चर्चा होत आहे.मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लई करू असं आश्वासन त्यांनी दिलंय.
शरद पवार गटाने परळी मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिलीय. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. परळी मतदारसंघातील घाटनांदूर येथे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत जर उद्याच्या काळात मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करु, असे राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले असून याची जोरदार चर्चा आता जिल्ह्यात होत आहे. राजेसाहेब देशमुख म्हणाले की, परळी परिसरात तरुण पोराला नातेवाईक म्हणून येत असतांना विचारतात नोकरी आहे का, काही कामधंदा आहे का, पालकमंत्र्यांनाच येथे काही उद्योगधंदा नाही, तुमचा कुठून येणार? एकही उद्योगधंदा उभा केला नाही. यामुळे मुलांचे लग होणे मुश्कील झाले आहे.सर्व पोरांना मी या ठिकाणी आश्वासन देतो. जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोराचे लग्न करु. सगळ्या पोरांना कामधंदा देऊ, त्यामुळे आगे बढ़ो म्हणल्याशिवाय पर्याय नाही असे आश्वासन परळी मतदारसंघातील राजेसाहेब देशमुखांनी दिले असून त्यांच्या या अजब आश्वासनाची आता जोरदार चर्चा होतांना दिसत आहे. जिल्ह्यात निष्क्रिय आणि कुचकामी पालकमंत्री आहेत. हुकमी एक्का आणि दादागिरी सुरू आहे. असंही राजेसाहेब देशमुख यांनी म्हटलं.
यावेळी बीड जिल्ह्याचे खा. बजरंग बप्पा सोनवणे,, ॲड माधव आप्पा जाधव, सुधामती ताई गुटे ,राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी ताई देशमुख, शेतकरी संघटनेचे आपेट, उत्सव जाधव, कलाकर मिसाळ, राजकमल देशमुख, बाळासाहेब देशमुख, शेख मुख्तार, सहबाज शेख, यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.