Uncategorized

भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी व सरपंच देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी घाटनांदुर कडकडीत बंद

महेंद्र गोदाम
ग्रामीण प्रतिनिधी

घाटनांदुर (अंबाजोगाई) दि:17:- परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिआकृतीची तोडफोड केल्यानंतर रस्त्यावर उतरलेल्या आंदोल आंदोलन कर्त्याआंदोलन कर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली होती यातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा परभणी पोलिसांच्या कस्टडीत अमानुषपणे केलेल्या मारहाणी मुळे मृत्यू झाला होता, शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी व मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यास घाटनांदुर येथे भावपूर्व श्रद्धांजली वाहण्यात आली, दिव्यांगत सोमनाथ हासूर्यवंशी युवक एल एल बी.च्यािमत शिकत होता परभणी येथे जातीवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीने भारतीय संविधानाच्या प्रति आकृतीची तोडफोड केल्यानंतर आंबेडकर प्रेमींच्या वतीने परभणी शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनात सहभागी झाला म्हणून सोमनाथ व्यंकटी सूर्यवंशी परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
त्याचा परभणी पोलिसांच्या कस्टडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे तसेच परभणी पोलिसांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे,800 ते 900 लोकांवर गुन्हा दाखल झालेले आहेत त्यात विद्यार्थी महिला असे आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी ही होती , तसेच मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचाही भर दिवसा अपहरण करून मारण्यात आले, मारे कर यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असेमान्य नागरिकांची या आंदोलनात मागणी होती, हा मोर्चा तथागत चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा होता छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली , भीमसैनिकांनी अंबाजोगाई पोलीस ग्रामीण ला निवेदन देऊन घाटनांदुर हे गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले होते,सर्व गावकरी या बंदमध्ये सामील होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!