Uncategorized

एसआयटीमधील अनेक अधिकाऱ्यांना हटवलं!

बीड :- प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठीच्या विशेष तपास पथकात (SIT) मोठा बदल करण्यात आला आहे.यामध्ये एसआयटीमधील अनेक अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं आहे.देशमुख कुटुबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी देखील एसआयटीमधील अधिकारी बदलण्याची मागणी केली होती.ती मागणी मान्य करत एसआयटी मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

नवीन विशेष तपास पथक :-

(SIT)किरण पाटील (अपर पोलीस अधिक्षक,राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)अनिल गुजर (पोलीस उप अधीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)सुभाष मुठे (पोलीस निरीक्षक,राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)अक्षयकुमार ठिकणे (पोलीस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे)शर्मिला साळुंखे (पोलीस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग,महाराष्ट्र राज्य, पुणे)दिपाली पवार (पोलीस हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे)यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!