Uncategorized

ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहोत खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका-जिल्हा व्यवस्थापक गोविंद साखरे

केज :- दत्तात्रय मुजमुले

ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील सर्व ठेवीदारांच्या ठेवी ह्या सुरक्षित आहोत .खोट्या अफवावर कोणत्याही खातेदार अथवा ठेवीदारांनी विश्वास ठेवू नका व सर्व खातेदार, ठेवीदारांना ज्ञानराधा मल्टीस्टेटचे जिल्हा व्यवस्थापक गोविंद साखरे यांनी आवाहन केले आहे.

आमच्या सर्व शाखेतील सर्व खातेदार व ठेवीदारांच्या ठेवी ह्या सुरक्षित असून सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत त्यामुळे कोणीही गोंधळून अथवा घाबरून जाऊ नये जेव्हा ही खातेदारांना अथवा ठेवीदारांना पैसे काढायचे असतील तेव्हा त्यांच्या खात्यातील अथवा ठेवींतील त्यांची रक्कम आम्ही परत करत आहोत.दिनांक १३ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या दरम्यान आमच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या नावाने खोटी अफवा पसरविण्यात आलेली आहे त्यामुळे आमचे खातेदार व ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तरी सर्व आमच्या ठेवीदार व खातेदार यांना विनंती करण्यात येत आहे की, आपल्या सर्वांच्या ठेवी ह्या सुरक्षित असून आम्ही ज्या खातेदाराला अथवा ठेवीदारांना त्यांची रक्कम काढून घ्यायची आहे त्यांना आम्ही तात्काळ त्यांची रक्कम परत करीत आहोत.तरी सर्व खातेदार व ठेवीदारांनी आमच्या प्रत्येक शाखेमधील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती देखील केली आहे.आम्ही कोणत्याही खातेदाराचे अथवा ठेवीदारांचे एकही रुपया बुडवणार नाहीत आम्ही सगळ्यांचे पैसे देण्याकरिता तयार आहोत फक्त सर्वांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका उद्या शनिवारी आहे.

तरी देखील आम्ही आमची शाखा चालू ठेवणार आहोत. तरी सर्व ग्राहकांनी खोट्या अफवांना बळी पडू नका असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना जिल्हा व्यवस्थापक गोविंद साखरे यांनी सांगितले आहे व सर्व खातेदार ठेवीदारांना आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!