वृक्षसंवर्धनातुन पर्यावरणाचे संतुलन राखावे :- ॲड. मनिषाताई कुपकर

केज :- दत्तात्रय मुजमुले
आर्ट ऑफ लिव्हिंग व आय.ए.एच .व्ही व ओ.व्ही .बी. आए च्या सहकार्यातून व जनविकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात 50 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून आज दिनांक 24. रोजी जनविकास प्रशिक्षण केंद्र सुर्डी फाटा तालुका केज या ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांना प्रत्येक कुटुंबाला पाच झाडे याप्रमाणे अडीच हजार रोपे देण्याचा संकल्प करण्यात आला त्याची सुरुवात आज करण्यात आली.
प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराच्या परिसराच्या आजूबाजूला किमान पाच फळांची झाडे लावावीत जेणे करून सदर कुटुंबाचे पर्यावरणासंबंधी चे दायित्व कायम राहील तसेच संबंधित कुटुंबाला या झाडाची फळेही खायला मिळतील त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राहून वृक्ष संवर्धन होईल असे मत या कार्यक्रम प्रसंगी बोलताना ॲड. मनिषाताई कुपकर यांनी मत व्यक्त केले. ज्या कुटुंबाकडे घराच्या आजूबाजूला जागा उपलब्ध आहे आणि वृक्षसंवर्धनाची त्याची इच्छा आहे अशा प्रत्येक कुटुंबाला पाच फळ झाड देण्याचा संकल्प त्यांनी केला. तर जनविकासचे सचिव रमेश भिसे यांनी वृक्ष संवर्धन काळाची गरज ओळखा आणि वृक्ष लागवडावरती समाजाने भर दिला पाहिजे तरच पर्यावरण संतुलन राहील व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण सक्षम राहू असे मत व्यक्त केले. यावेळी ग्रामीण भागातील लोकांनी वृक्षसंवर्धन कार्यक्रमाबद्दल आपापल्या दारात घराच्या आजूबाजूला तसेच शेताच्या बांधावर ती मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा संकल्प केला व सहभागी झालेल्या लोकांना वृक्षाचे रोपाची वाटप करण्यात आले.
कार्यक्रच्या यशस्वीतेसाठी जनविकास सामाजिक संस्थेच्या टीमने परिश्रम घेतले.यावेळी कार्यक्रमासाठी डॉ. खोडसे,सूर्डीचे सरपंच काशिनाथ भिसे,पंकज भिसे,बाबा पोठभरे,बालाजी भिसे अशोक बिक्कड यांच्यासह सुर्डी, सोनेसांगवी, माळेगावं, सुकळी येथील नागरिक उपस्थित होते.