Uncategorized

शेतकऱ्यांच्या पोरांचा ; सोशल मीडियावर # कोरडा दुष्काळ ट्रेंड

बीड :- दत्तात्रय मुजमुले

खरीप हंगामात जुलै – ऑगस्ट महिन्यात मध्ये बीड जिल्ह्यातील म्हणजेच सर्व तालुक्यातील मंडळात दीर्घकाळ पावसाने हुलकावणी दिल्यामुळे मोठा खंड पडलेला असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व मंडळातील पिके धोक्यात आली आहेत. हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून आता ते सुकून गेली आहेत. 7 लाख पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावरील पीके पावसाने खंड दिल्याने अडचणीत आले आहे. कापूस, तूर, सोयाबीन, मूग ,उडीद सह इतर पिके पावसापाण्याअभावी सुकुन गेल्या आहेत. पावसाळ्याचे तीन महिने संपत येत असताना केवळ 40%पाऊस पडला आहे. या कमी पर्जन्यमानामुळे कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.काही ठिकाणी पिके हिरवी दिसताहेत मात्र त्याला लागणाऱ्या फुलं ही करपून गेली आहेत.

मराठवाड्यासह बीड जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे संकट पडले आहे मात्र याविषयी कोणी राजकारणी सत्ताधारी बोलायला तयार नाही.सरकारने शेतकऱ्यांना २५ % अग्रीम देण्यासाठी अधिसूचना काढली मात्र त्यातूनही अनेक महसुन मंडळे वगळण्यात आलेले आहेत.मंजूर महसून मंडळविषयी शेतकऱ्यांत संभ्रम आहे.शेतकऱ्यांना सरसकट मदतीची अपेक्षा असताना अशी दुट्टपी भूमिका सरकारने घेतली आहे.दुष्काळाचे सावट निर्माण झाले असताना दुष्काळा विषयी सत्ताधारी बोलायला तयार नाहीत म्हणून आता शेतकऱ्यांची तरुण पोरं आपल्या बापासाठी रस्त्यावर उतरावं लागणार असल्याचे सोशल मीडियावरून दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर # कोरडा दुष्काळ ट्रेंड सुरू झाला असून दुष्काळावर तरुण पिढी बोलू लागली आहे.शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर; रुमने हातात घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल, दुष्काळ जाहीर करा.अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!