मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून घेतलेले पीक वाया गेले; मदत कधी करणार? :- उञेश्वर शेप

केज :- दत्तात्रय मुजमुले
परतीच्या पावसाने पिकांचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी पिकांसाठी बि-बियाणे,खते,फवारणी यावर लाखोंचा खर्च केलेला आहे.परंतू अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.बीड जिल्ह्यातील सोयाबीन पीक हे या परिसरातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे . त्याचबरोबर सोयाबीन काढणाऱ्या मजुराची देखील मजुरी मिळवून उदरनिर्वाह भागवण्याचे हेच साधन आहे.या परतीच्या पावसाने शेतकरी आणि सोयाबीन काढणारा मजूर या दोघांवर देखील पावसाने संक्रांत आणल्याने शेतकरी आणि मजूर दोघेही मेटाकुटीला आले आहेत.त्यांना मदत कधी करणार ? शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी उत्रेश्र्वर शेप यांनी केली आहे.
यावर्षीचा परतीचा पाऊस आणि सोयाबीन काढण्याचा हंगाम एकाच वेळी सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी परतीच्या पावसाने हिरावून नेल्याचे चित्र असून सणासुदीच्या काळात दसरा आणि दिवाळी कशी साजरी करावी या विवंचनेत शेतकरी सापडला आहे . तसेच परराज्यातून देखील दरवर्षी सोयाबीन काढणीसाठी मजुरांच्या मोठ्या संख्येने टोळ्या येत असतात , पण यावर्षी परतीचा पाऊस उघडण्याच्या मनस्थितीत नसल्याने हे परराज्यातील मजूरदेखील परत गेले आहेत. मराठवाड्यातील मजुरांना विशेषतः या परिसरातील मजुरांना मजुरीचे कामच मिळत नसल्याने शेतकऱ्यानसह त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे शासनाने शेतकऱ्यांसह मजुरांना मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते उत्तरेश्वर शेप म्हंटले आहे.