पुर्व सेवेतील पाणलोट पथकातील सदस्यांनाच केंद्राच्या नव्या प्रधानमंत्री कृषि सिंचन भाग 2 मध्ये सामावून घ्या- बाबासाहेब कोकाटे

केज :- दत्तात्रय मुजमुले
पुर्व सेवेतील पाणलोट पथकातील सदस्यांनाच केंद्राच्या नव्या प्रधानमंत्री कृषि सिंचन भाग 2 मध्ये सामावून घेण्याची मागणी बाबासाहेब कोकाटे यांनी मुख्यमंत्री महोदयांना केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, केंद्रशासन यांची सामाईक मार्गदर्शक सुचना 2008, 2011 व 2021 अन्वये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पात परिच्छेद 40 नुसार पाणलोट पवक सदस्य डब्ल्यूडीटी यांची सेवा घेण्याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये उल्लेख केलेला आहे तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना भाग 1 मध्ये 9 वर्ष मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये या कर्मचार्यांनी काम केलेले आहे. तरी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक भाग 2 या योजनेमध्ये केंद्र शासनाने नवी दिल्ली येथील दि.10.10.2022 रोजीच्या आढावा बैठकीत प्रकल्प कार्यान्वीन यंत्राना निवड करून पाणलोट विकास पथक स्थापन करून त्यांच्या मदतीने लोकसहभाग घेऊन सविस्तर प्रकल्प आरखडे सादर करण्यास दि. 12.11.2022 पर्यंत अंतीम मुदत निश्चीत करून दिलेली आहे. तरी आपण सहानुभूती पूर्वक मा.प्रधान सचिव मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांना आदेशीत करून पाणलोट पथक सदस्य यांना या प्रकल्पात काम करण्याची संधी प्राप्त करून नियुक्ती आदेश देण्यात यावे. सन 2008 पासून एकात्मिक पाणलोअ व्यवस्थापन कार्यक्रम सुरू झाला. केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत तालुक कृषि कार्यालय अधिनस्त प्रकल्प 2001 ते 2020 या कालावधमीमध्ये कृषि तज्ञ, उपजिवीका तज्ञ, समुदाय संघटक या पदावर गेली 7 ते 9 वर्ष कंत्राटी स्वरूपात 11 महिन्याच्या करारावरती काम केले आहे. परंतु मार्च 2020 मध्ये योजना संपल्यामुळे व कोरोना काळात दुसरी योजना चालु नसल्याने सर्व कंत्राटी कर्मचारी यांना कामावरून कमी केले आहे.
या प्रकल्पामध्ये डब्ल्यूडीटी कृषि तज्ञ, उपजिवीका तज्ञ य समुहक संघटक यांच्य नियुक्त्या केल्या. सदरील प्रकल्पात संबंधित 52 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण अनुभव असल्याने ते केंद्र शासनाच्य प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या प्रकल्पात योग्य प्रकारे काम करू शकतील तसेच त्यांच्या प्रशिक्षणावर शासनास पुन्हा नव्याने खर्च करण्याची गरज भासणार नाही. या कृषि तज्ञ, उपजिविका तज्ञ व समुहक संघटक यांना या नव्याने सुरू झालेल्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या प्रकल्पात समायोजन करून घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष बाबासाहेब कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे.