Uncategorized

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत अन्नत्याग उपोषन !

केज :- दत्तात्रय मुजमुले

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील युवक रोहन गलांडे यांनी केज तहसीलदार यांना निवेदन देऊन काल पासून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात सुरुवात केली होती. आज दि.११ सप्टेंबर रोजी उपोषणाचा दुसरा दीवस आहे.ग्रामपंचाय कार्यालय ,ढाकेफळ यांनी व महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेना यांनी चिंचोली माळी येथे उपोषणाला बसलेल्या रोहन गलांडे यांना निवेदनाद्वारे पाठींबा देण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळवुन,मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत अन्नत्याग उपोषन करणार आहे असे निवेदनाद्वारे रोहन गलांडे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी अथवा आरक्षण भेटण्यासाठी सरकार व प्रशासनाने याची दखल घेऊन समस्त मराठा बांधवांना आरक्षण देऊण उपकृत करावे. मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण भेटत नाही तो पर्यंत हे उपोषण चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उपोषण काळामध्ये जर त्यांना व त्यांच्या कुटुंबाला काही कमी जास्त झाले तर याला पुर्णपणे सरकार व प्रशासन जबाबदार राहिल असे निवेदनाद्वारे रोहन गलांडे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!