नायगांव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात साखळी उपोषणाला सुरूवात

केज :- प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवस आमरण उपोषण केले होते .सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन दोन महिन्यांचा कालावधी मागून घेतला आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मराठा समाज एकवटला असून त्यांच्या समर्थनात मराठा समाज एकवटून राज्यभर ठीक ठिकाणी साखळी उपोषणाला सुरूवात झाली आहे.
तालुक्यातील मौजे नायगांव येथील मराठा समाज बांधवांच्या वतीने दिनांक 5 डिसेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.जरांगे पाटील सांगतील तेच धोरण नायगांवकरानीही अवलंबले आहे.मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे ही आग्रही मागणी जरांगे पाटलांनी घेतली आहे.मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि सरकारला ही स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा त्यांनी त्यांच्या भाषणातून दिला आहे.
मराठा आरक्षणाला नायगाव येथील सर्व जाती धर्मातील नागरीक समर्थन देत पाठिंबा दर्शवला आहेत.