Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे भव्य स्वागत…योगेश बहल

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त यंदा ६५ वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५” गुरुवार दिनांक ०१ मे ते ०४ मे २०२५ रोजी आजी झांबोरी मैदान वरळी मुंबई या ठिकाणी सायंकाळी चार ते दहा पर्यंत समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचे सन्मान करण्यात येतील त्या मध्ये प्रामुख्याने १)गर्जा महाराष्ट्र माझा (संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास), २) महाराष्ट्र धर्म (समाज सुधारणेची सांगड घालणारी संत परंपरेचे तेजस्वी दीपस्तंभ), ३) महाराष्ट्राचे विचार सूत्र (समता न्याय आणि प्रगतीसाठी लढणारे प्रेरणादायी महापुरुष), ४) महाराष्ट्र रत्न (विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या गौरवशाली व्यक्तिमत्त्वांची ओळख), ५)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (दूरदृष्टी निर्णय क्षमता आणि जनतेसाठी लढणाऱ्या नेतृत्वांचा गौरव) यामध्ये प्रामुख्याने आज तागायत राज्यात नेतृत्व केलेल्या सर्व माजी मुख्यमंत्री यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५ या कार्यक्रमामुळे समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत व शेवटच्या घटकापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे व विचार पोहोचविण्यात मदत होणार आहे, तसेच बाईक रॅली वरती यात्रेची माध्यमातून संपूर्ण शहरात सकारात्मक वातावरण निर्मिती होणार आहे.
सदर रथयात्रा व रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष, आमदार अण्णासाहेब बनसोडे तसेच शहराध्यक्ष योगेश बहल तसेच शहरातील आजी माजी आमदार, महापौर, नगरसेवक, नगरसेविका, सेल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!