Uncategorized

केजकरांचे तहसीलदारांना निवेदन

केज :- दत्तात्रय मुजमुले

बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा व्हावा यासाठी स्व.विमलताई मुंदडा यांनी सर्वोतपरी प्रयत्न केला.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कार्यालयाची उभारणी शहरात अद्ययावत झाली मात्र आंबेजोगाई जिल्हा निर्मितीचा निर्णय प्रलंबित आहे.वर्षानुवर्षे हे भिजत घोंगडे कायम आहे.मात्र आता परत एकदा अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी जनआंदोलन उभारत आहेत.अंबाजोगाईकरानी यासाठी कंबर कसली असताना आता केज करांनी देखील यात उडी घेत जिल्हानिर्मितीची मागणी केली आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद असे की,सर्व बाबींचा विचार करता,अंबाजोगाई जिल्हा करण्यात यावा व तात्काळ जाहीर करून लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सर्व कार्यालये कार्यान्वित जेणे करून वाढती लोकसंख्या,वाढती गरजा पाहता अंबाजोगाई जिल्हा लवकरात लवकर करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनावर भाई मोहन गुंड,पत्रकार धनंजय कुलकर्णी,पत्रकार रामदास तपसे,राहुल खोडसे,पत्रकार महादेव गायकवाड,पत्रकार हनुमंत सौदागर,पत्रकार गौतम बचुटे,पत्रकार साजेद इनामदार,चालक प्रमोद पांचाळ,सुग्रीव करपे,पंडित चाळक, खोडसे रोहन,शार्दुल कुलकर्णी,नितीन गुजर यांच्यासह इतर स्वाक्षरी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!