राजकीय

पत्रकारांच्या भावना दुखावणे हेतू नव्हता. दिलगीर आहे :-खा. बजरंग सोनवणे

केज :- वार्ताहार

बीड जिल्ह्याचे खा.बजरंग सोनवणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्या विरोधात संशय निर्माण करणारी बातमी करणाऱ्या पत्रकाराबाबत एका कार्यक्रमात अपशब्द वापरले होते. त्याबद्दल अखेर खा.बजरंग सोनवणे यांनी पत्रकारांच्या भावना दुखावणे हा हेतू नव्हता म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की,बीड येथे आ. संदीप क्षीरसागर यांच्या नागरी सत्कार समारंभात खा.बजरंग सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्या विरोधात संशय निर्माण करणारी बातमी करणाऱ्या पत्रकाराबाबत अपशब्द वापरले होते.मात्र केज विधानसभा मतदार संघात जीवाचे रान करत प्रचार केला व प्रचार यंत्रणा सांभाळली असे असताना माझ्या भूमिकेवर संशय निर्माण करणारी ती विशिष्ठ बातमी माझ्या सारख्या कार्यकर्त्यास अत्यन्त मनस्ताप देणारी ठरली असल्याने भावनेच्या भरात अनावधानाने काही शब्द गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.त्यावेळी उल्लेख केलेल्या शब्दानी कुणाच्या भावना दुखाव्यात असा अजिबात हेतू नसल्याचे त्यांनी पत्राद्वारे म्हटले होते.

मात्र पत्रकरातीलच कोणी ठरवून बदनामीकारक किंवा संशय निर्माण करणारे वार्ताकन विशेषकरुन निवडणूक काळात करत असतील तर आपण पत्रकार म्हणून अशा मित्रांना योग्य मार्गदर्शन करावे. व ज्या प्रमाणे माझ्याकडे आपण व्यक्त झालात असेच भविष्यात चुकीच्या बातमीला बंधन घालाल अशी अपेक्षाही पत्रकार यांच्याकडून करत माझ्या वक्तव्याने कुणाचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करत आहे.अशा शब्दात त्यांनी झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!