केतकी चितळे विरोधात सामाजिक कार्यकर्ते,वकील बांधवांचे निवेदन

अंबाजोगाई :- प्रतिनिधी
सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी केतकी चितळे या वादग्रस्त महीलेने दि. 26 फेब्रुवारी रोजी परळी येथे झालेल्या ब्राम्हण ऐक्य परिषदेमध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारे बेताल वादग्रस्त विधान केले. बौद्ध समाज, मराठा समाज व सर्व विधीज्ञ मंडळी यांच्या भावना दुखावतील असे बेताल वक्तव्य करुन तेढ निर्माण केली.
यापूर्वीही अनेक वेळा केतकी चितळेने बेताल वक्तव्ये करुन अनेकवेळा सार्वजनिक भावना दुखावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथे यापूर्वीही तीच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असूनही तीच्यावर कडक कारवाई न केल्यामुळे पुन्हा पुन्हा असे बेताल वक्तव्य करून समाजाच्या भावना सतत पायदळी तुडवत आहे.असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात केतकी चितळेवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावे या मागणीसाठी अंबाजोगाई येथील वकील बांधव ,सामाजिक कार्यकर्ते यांनी अंबाजोगाई शहर पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
निवेदनावर ॲड.अरविंद मोटेगावकर,राजेश वाहुळे,प्रकाश बोरगावकर, राणा चव्हाण, यांच्या सह्या आहेत.