राजकीय

परीट धोबी समाज बांधवांच्या एकजुटीचा विजय – पै सुभाष (अण्णा ) पिसाळ चेअरमन


महाविकास आघाडी सरकारच्या काळात माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे यांनी मंत्रालयात राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांची दशसूत्री मंत्रालयात लावली होती परंतु नवीन सरकारने सत्ता बदल होताच तिथून श्री संत गाडगेबाबांची दशसूत्री काढली होती त्यासंबंधी संपूर्ण महाराष्ट्रातून परीट धोबी समाज बांधवां मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये सर्व संघटनांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदने देऊन परत त्या ठिकाणी श्री संत गाडगेबाबा यांची दशसूत्री लावण्याचे निवेदन दिल्याने व अन्यथा आंदोलन केले जाईल या आशयाचे निवेदन महाराष्ट्रातून देण्यात आली .काल मंत्रालयामध्ये श्री संत गाडगेबाबांची दशसूत्री परत आहे त्या ठिकाणी लावण्यात आली हा सर्वात मोठा परिट धोबी समाज बांधवांच्या एकजुटीचा विजय आहे .भविष्यात समाज असाच एकजुटीने राहिल्यास समाजाचे अन्य प्रश्न देखील सुटणार आहे असे मत कौठळी गावचे सामाजिक कार्यकर्ते पै . सुभाष पिसाळ माजी चेअरमन यांनी व्यक्त केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!