मराठा आरक्षणाच्या लढाईचे साक्षीदार होण्याचे आवाहन

केज:- दत्तात्रय मुजमुले
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मराठा समाजाचे आजवर अनेक आंदोलने,मोर्चे काढले मात्र येथील निगरगट्ट आणि गलेलठ्ठ राजकारण्यांची फक्त स्वतः पोळी भाजून घेत समाजाला आरक्षणाविना उपेक्षित वंचित ठेवण्याचे काम केले आहे.मात्र यावेळी सरकारला मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने खमक्या नेतृत्व मिळाले असून सरकारला चांगलीच खुट्टी मिळाली आहे असे बोलले जात आहे.
मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावे व कायद्याच्या चौकटीत राहूनच टिकेल असे 50 टक्केच्या आत आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे समाजाने भक्कम पाठीमागे राहून आपल्या मुला – बाळांच्या भविष्यासाठी आरक्षणाच्या लढाईत सर्व लहान थोर महिला पुरुषांनी जालना जिल्ह्यातील आंतरवली येथे १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महासभेस लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांनी केले आहे.
चौकट :- निगरगट्ट सरकारला घाम फोडण्यासाठी,आपल्या मुला बाळांच्या भविष्यासाठी,हक्काच्या आरक्षणासाठी ,आत्ता नाही तर कधीच नाही म्हणून मराठा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने महा सभेस उपस्थित राहावे.