राजकीय

मौजे भालगाव येथील ग्रामस्थांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

केज :- दत्तात्रय मुजमुले

तालुक्यातील मौजे भालगाव येथील ग्रामस्थांनी निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला ‘आधी आरक्षण मग निवडणूक’ आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले.

भालगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत एकही उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतला आहे.भालगाव येथील ग्रामस्थ, पॅनल प्रमुख व सरपंच पदाचे उमेदवार यांची एकत्रित बैठक झाली. यात सर्वांच्या वतीने ठराव घेतला की, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार असेल. गावातील एकाही उमेदवाराने अर्ज दाखल करायचा नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगित करा. जर निवडणुका घेतल्या तर भालगाव येथील एकही उमेदवार निवडणूकीत उमेदवारी दाखल करणार नसल्याचा निर्धार भालगाव ग्रामस्थांनी केला आहे.

यावेळी माजी सरपंच युवराज ढोबळे, अंकुश मोरे, चंद्रकांत मोरे,पिंटू ढोबळे,मयूर सुरवसे, बाळासाहेब मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!