दापोडी येथे संविधान दिनी घटना उद्देशीका वाटप करून संविधान दिवस साजरा….

२६/११ दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या विर हुतात्म्यांना केली आदरांजली अर्पण.
प्रतिनिधी (पिंपरी – चिंचवड) :संविधान संरक्षण समिती दापोडी आयोजित 26 नोव्हेंबर 2023 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रम दापोडी येथील त्रिरत्न सांस्कृतिक हॉल डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आयोजित करण्यात आला होता.यावेळी संविधान प्रचारक व अभ्यासक मा.संदीपजी बर्वे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, त्यांनी राज्य घटनेच्या उद्देशिकेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, संविधान उदेशिका ही आपल्या देशाचे मार्गदर्शक तत्त्व आहेत. या उद्देशिकांवर आधारित आपण एक सुखी, समृद्ध आणि न्याय्य समाजाची निर्मिती करू शकतो.संविधानाची अंमलबजावणी हीच खरी राष्ट्रसेवा,भारतीय संविधानातील मूल्ये समाजाच्या उन्नतीसाठी महत्वपुर्ण आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी भारतीय संविधानाची पुर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे.असे आपल्या व्याख्यानातून त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणून सर्व भारतीयांना समतेची वागणूक देणाऱ्या संविधान प्रस्तावनाचे सामूहिक वाचन झाले. महापुरुषांच्या प्रतीमेस पुष्पांजली अर्पण करून, 26/11 दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना वीर आदरांजली अर्पण केली. व प्रामुख्याने कायदा व सुव्यवस्थेच्या कोणत्याही परिस्थितीत कायम निस्वार्थी धर्मनिरपेक्ष संरक्षण देणाऱ्या सर्व स्तरातील पोलीस बांधवांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमा वेळी प्रमुख मार्गदर्शन पाहुणे म्हणून सुलक्षणा शीलवंत, सुप्रिया सुरगुडे,मनोज गरबडे, सुनीताताई अडसूळ,विजयाताई साठे,शकुंतला ताई शेलार,स्वप्निल कांबळे,उषाताई भोसले,राजू वारभुवन,अनिल जगताप,नागेश भोसले,उमाताई शिंदे,इमाम शेख,सीता जगताप आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन राहुल सोनवणे यांनी केले.तर संविधान समिती आयोजित कार्यकर्ते राजेंद्र आप्पा गायकवाड,महेश गायकवाड,विकास सातारकर,अक्षय गायकवाड,दीपक रोकडे,विकास ओव्हाळ,अमित फुलपगार,संदेश बोराडे,मुकेश गायकवाड,सचिन शेलार,विशाल केदारी,कुणाल कांबळे,नितीन कांबळे,सचिन गावडे,धनराज गंभीरे आदींनी या कार्यक्रमासाठी मोठे योगदान दिले.
मा. अक्षय गायकवाड यांनी आभार व्यक्त करून येणाऱ्या प्रत्येक नागरिकास संविधान उद्देशिका वाटप करून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.