राजकीय

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी जनहित कामगार संघटना बैठक संपन्न

मुंबई :- बदलापूर मुंबई येथे शेतकरी जनहित कामगार संघटनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीसाठी संघटनेचे सर्वासर्वे जयवंतराव कांबळे, प्रदेशाध्यक्ष दीपक गायकवाड,बीड जिल्हाध्यक्ष पांडुरंग कसबे, इंद्रजीत डोंगरे धाराशिव जिल्हा अध्यक्ष पियुषकुमार सावंत,लातूर जिल्हाध्यक्ष गंगारामजी साठे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पगारे,प्रशिक वाघमारे, रोहन गाईसमुद्रे,यांच्यासह जिल्हापदाधिकारी उपस्थितीत होते.

यावेळी जयवंतराव कांबळे यांनी शेतकरी हितासाठी व कामगारांच्या हितासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणूका ह्या स्वबळावर लढू अशी घोषणा केली. तसेच महाराष्ट्राचे युवा प्रदेशाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना गावागावात जाऊन शेतकरी व कामगार याच्या पर्यंत पोचण्याचे काम शेतकरी जनहित कामगार संघटना करेन असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!